आज तू वाटेल ते नारे लगाव रे..
पायजे त्या घोषणा दे.. जाळ आणि धूर काढ संगटच.
तलवारी काढ, काठ्या घे, बंदुक घे, पेट्रोलबॉम्ब टाक
मनातली सगळी घाण, गटारापेक्षा दुर्गंधी, वाहूंदे निर्बंधी...
रक्त गरम आहे तुझं, धमन्यातून वाहतो क्रुड ऑइलचा बॅरल...
धीर धरत नाहीस तू, दोन ओळींपेक्षा जास्त वाचत नाहीस तू..
तुला पेटवायचंय ह्यांना, त्यांना.. सगळ्यांना दाबून ठेवायचंय तुझ्या हाताखाली.
हक्क मागतो तू. पण फक्त अधिकार गाजवायचाय तुला, हेच केवळ सत्य आहे रे...
ह्याचा जय, त्याचा जय, हा मुर्दाबाद, तो मुर्दाबाद... पाठव तू कोणकोणाला पाकिस्तानातही.
विसरु नको गड्या पर एक सांगतो जीवापासून तळमळीने....
तू पेटवलेल्या संसारावर भाजतो पोळी दुसरा कोणीतरी....
तुझ्याही संसाराला आग लावली तू तुझ्याच हाताने त्यासाठीच रे....
सर्व जळून खाक व्हैल एक न एक दिवस.....
जीव मुठीत घेऊन तू बी फिरत असशील भग्न शहरातल्या वाटांवरुन....
आई बाप बायको पोरं, तुझी रे सगळी...कापलेली असतील तुकड्यांमध्ये
तलवारीला त्या नाव नसेल, धर्मपण कोणता ओळखू शकणार नाहीस तू...
तेव्हा तुला जगण्याचं महत्त्व कळेल.. प्रेमाचं महत्त्व कळेल....
महत्त्व कळेल तुला संविधानाचं....
सगळे ग्रंथ, गीता, कुराण, बायबल, फेकून देशील त्याच आगीच्या ज्वाळांमध्ये
मग घेऊन फिरशील भारतीय संविधानाची मिळतील ती पाने गोळा करत....
सांगू पाहशील तुला भोसकणार्या प्रत्येक चाकू आणि गोळीला की
"आम्ही भारताचे लोक....आम्ही भारताचे लोक
भारतास एक संपूर्ण प्रभुत्व-संपन्न समाजवादी धर्मनिरपेक्ष
लोकतंत्रात्मक गणराज्य बनविण्यास, तसेच त्याच्या समस्त नागरिकांना:
सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म
आणि उपासनाची स्वतंत्रता, प्रतिष्ठा आणि संधिची समता प्राप्त करण्यासाठी
तसेच त्यासर्वांमध्ये व्यक्ति ची गरिमा आणि राष्ट्राची एकता व अखंडता
सुनिश्चित करणारी बंधुता वाढविण्यासाठी..."
तुझे तेव्हा कोणीही काहीही ऐकणार नाही रे...
आज जी तू आग लावतो आहेस ती तुलाच धरणार आहे एक दिवस निश्चित
तुला फक्त संविधानच वाचवू शकेल, पण आज तू ...
त्याच संविधानाला आग लावायला सरसावला आहेस हे लक्षात असू दे...
हे ही लक्षात असू दे, संविधानाला आग लावणार्याला
जीवंत सोडणार नाही मी पण. कोणालाच सोडणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा